Thursday 5 November 2009

हेडसेट

दोन आठवड्यांपूर्वी बंगलोरला गेलो होतो. तेव्हा हेडसेट कसा वापरायचा (हेडसेटला मी इअर फोन म्हणायचो) ते नदीमने सांगितलं. काही गाणी—नवी आणि जुनी, मोबाईल फोनमध्ये कॉपी केली. हान्स झिमर (ग्लॅडिएटर), ए. आर. रहमान (स्लमडॉग मिलेनेअर), फरिदा खानुमच्या गझल, किशोर कुमार, महंमद रफी, हेमंत कुमार यांची गाणी हेडसेटवर ऐकायला लागलो.

हान्स झिमर आणि रहमान यांचं संगीत हेडसेटवर ऐकताना वाद्यमेळातील प्रत्येक वाद्याचा ध्वनी स्पष्ट ऐकू येतो. आपण त्या वाद्यमेळा (ऑर्केस्ट्रा) च्या मधोमध उभे आहोत असा अनुभव येतो. एखादं वाद्य कानाच्या मागे वाजतंय तर दुसरं आपल्या पुढ्यात वाजतंय असा अनुभव येतो. कानामध्ये संगीत घुमत नाही तर डोक्याच्या मध्यभागी, डाव्या, उजव्या, खालच्या, वरच्या भागात संगीत वाजत राहतं. म्हणूनच इअर फोनला हेडसेट म्हणू लागले असावेत.

जुनी हिंदी गाणी ऐकताना हा अनुभव येत नाही. कारण त्या गाण्यांचं ध्वनिमुद्रण करण्याचं तंत्रज्ञान वेगळं होतं. वाद्यमेळ म्हणजे ऑर्केस्ट्रा पारंपारिक भारतीय संगीतात नाही. वाद्य असतात पण ती साथीला. केवळ वाद्यसंगीतही असतं पण वाद्यमेळ नसतो. त्यामुळे भारतीय संगीतात नाट्य नसतं. नाट्य निर्माण होतं वाद्यमेळातून. वेगवेगळ्या वाद्यांच्या संयोजनातून. हिंदी चित्रपटांनी वाद्यमेळ पाश्चात्य संगीताकडून घेतला. तो उसना होता. पार्श्वगायक, पार्श्वसंगीत असेच शब्द आपल्याकडे रुढ झाले. ते शब्द प्लेबॅक सिंगर, बॅकग्राऊंड म्युझिक या इंग्रजी शब्दांचेच पर्याय होते. मात्र आपल्याकडे संगीत बॅकग्राउंडलाच असायचं. म्हणजे जुनी हिंदी गाणी ऐकताना दोन कडव्यांच्यामध्ये वाद्यमेळ येतो. तो गाण्याशी एकात्म झालेलाच असतो असं नाही. वाद्यमेळ काढून टाकला तरीही गाणं म्हणता वा ऐकता येतं. आनंद थोडा कमी होतो पण मूळ गाणं सर्वांनाच माहीत असेल तर वाद्यमेळाची जागा स्मृतीने भरून काढता येते. म्हणून तर आपल्याकडे अंताक्षरी सर्व भाषांमध्ये प्रसिद्ध आहे.

रहेमानचं संगीत असलेली गाणी वाद्यमेळाशी एकरूप झालेली असतात. म्हणजे जय हो हे गाणं वाद्यमेळाशिवाय गाताच येणार नाही. कोणी गायलाच तर कोणतं गाणं गातोय ते चट्कन कळणारही नाही. किशोर, रफी, हेमंत कुमार, लता, आशा, यांची गाणी ऐकताना असं होणार नाही. त्यामुळे असेल कदाचित् जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये संगीत म्हणजे गाणी—शब्द, चाली आणि आवाज असंच समीकरण होतं. दोन कडव्यांच्या मध्ये वाद्यसंगीत ठोकायचं असा खाक्या होता. त्यात अनेक संगीतकारांनी अनेक प्रयोग केले हे मान्यच करायला हवं. पण वाद्यसंगीतापेक्षाही शब्द आणि चाली यामुळे ती गाणी पिढ्यान पिढ्या टिकून राह्यली.

जुनी हिंदी वा मराठी गाणी ऐकायला इअर फोन पुरेसे होते. नवी गाणी ऐकायला हेडसेटच हवा.

4 comments:

  1. Very true,
    Meaningful lyrics contributed a great deal to Hindi Music.
    Music score especially the music interludes figured too.
    Music interludes of 'Awara Hu''Mein zindagika sath Nibhata chala Gaya'are in-seperable from the tune.
    Many music interludes later become fullfledged songs. (Ask details to music expert Hemant karnik)With new techologies like surround sound and virtual speakers, and high end music recording Mac based softwares like pro-tools it is natural for the musicians to explore its new possibilities.
    Would use a box camera once you have a hazzelblad or Nikon? Similarly Who would use Mono recording to day? Unless it is meant to give special effect? ( 'Doob ja mere pyar mein' from Johny Daddar has a mono track to this line as it wants to achieve a 'period'
    feel.
    Do keep in touch.
    Regards
    Meghnad

    ReplyDelete
  2. wa! Sa Re Ga Ma Pa madhye Headphone waparalyawar parikshak visheshta: Aavdhoot Gupte chtra vichitra natyamaya chitkar ka kadhto te samajale.

    ReplyDelete
  3. Waiting for your New post..
    reading ur blog is habitual now..

    ReplyDelete
  4. त्यामुळे भारतीय संगीतात नाट्य नसतं.
    Really?


    नाट्य निर्माण होतं वाद्यमेळातून.
    Really?

    ReplyDelete