Wednesday 3 June 2015

दोन कविता--आलापल्ली आणि इमामवाडा

आलापल्ली


जंगलात
तुम्ही
असता एकटे
असेनात काकितीही सखेसोबतीअरण्यात ऐकू येतेशांतताती होत नाही सहनम्हणून बडबडतात लोक(जसे खाकरतात सिनेमाहॉलमध्ये अंधार झाल्यावर)हळू हळू होतात मौनवृक्ष-वनस्पतींसारखेस्विच ऑफ करा तुमचे स्मार्ट फोन्स
तहानलाडू-भूकलाडू सोडून द्या कारमध्ये
डांबरी रस्त्यावरून जंगलात वळा
जंगलाला सरावल्यावर
कान आणि घ्राणेंद्रियं होतात तीक्ष्ण
आणि नजर सावध
गरज असेल तेव्हाच
फुटतो नरड्यातून आवाज
पशुपक्ष्यांप्रमाणे
मग तुम्हाला
दिसेल पाणी
ओळखता येईल
भक्ष्य आणि अभक्ष्य
दिसू लागेल गोष्ट पान, कळी, फूल आणि फळांमध्ये
नदी, झर्‍यामध्ये, चंद्र-सूर्यामध्ये किंवा आकाशातल्या चांदण्यामध्ये
मग तुम्ही गाणं म्हणाल
आजवर कधीही न ऐकलेल्या
सुरांमध्ये
वेगळ्या लयीत आणि तालात


इमामवाडा


कुठून आलो?
कुठे आहोत?
कुठे वळणार?
इमामवाड्यात
हे प्रश्नच फिजूल
असतात
कितीही हिंडलात
तरी तुम्ही तिथेच
असता
ओसाड, दगडी वाड्याने
घेरलेल्या भिंतीत चिणलेले
भिंतीत आणि कानात
घुमत असतं गाणं
तुमची प्रतिमा
बघत असते
बाहेरचा नजारा
शोधत असते
अनारकलीला

No comments:

Post a Comment